शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Wayanad landslides : वायनाड घटनेत १५६ जणांनी गमावला जीव, भूस्खलन का झालं? शास्त्रज्ञांनी कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:29 PM

Wayanad landslides : केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले.

Wayanad landslides ( Marathi News ) : केरळमधील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेत आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेकजण बेपत्ता असून आहेत. अजुनही या ठिकाणी मदत मोहिम सुरूच आहे, गेल्या काही दिवसापासून वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता वायनाडमधील वाढता पाऊस आणि भूस्खलनासारख्या घटना का घडत आहेत यावर एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी भाष्य केले आहे. या घटनांमागील कारणही त्यांनी सांगितले आहेत. 

केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले. 

वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सगळ्यांची कारणे सांगितली आहेत. एस अभिलाष हे कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वातावरणीय रडार संशोधन केंद्राचे संचालक आहेत. ते म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून कासारगोड, कन्नूर, वायनाड, कालिकत आणि मलप्पुरम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

'२०१९ मध्ये असेच ढग तयार झाले होते'

" गेल्या दोन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. यामुळे माती जड झाली. २९ जुलै रोजी अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ खोल 'मेसोस्केल क्लाउड सिस्टिम' तयार झाली होती. यामुळे मुसळधार पाऊस झाला आणि नंतर भूस्खलन झाले. २०१९ मध्ये केरळमध्ये पूर आला होता त्यावेळीही असेच ढग तयार झाले होते. काहीवेळा असं किनाऱ्याकडे होतं. २०१९ मध्येही असेच घडले होते. 'दक्षिण-पूर्व अरबी समुद्र गरम होत आहे, यामुळे केरळसह या भागातील वातावरण अस्थिर होत आहे,असं आमच्या संशोधनात असे आढळून आले आहे, असंही वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष म्हणाले. 

कर्नाटक, कोकणातही परिणाम

एस अभिलाष यांनी सांगितले की, हा बदल हवामान बदलाशी देखील संबंधित आहे. पूर्वी असा पाऊस मंगळुरू जवळील ‘उत्तर कोकण पट्ट्यात’ अधिक प्रमाणात होत होता. २०२२ मध्ये, अभिलाष आणि इतर शास्त्रज्ञांचे संशोधन हवामान आणि वातावरणीय विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अधिक वेगाने सरकतो. अभिलाष आणि आयआयटीएम आणि आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी २०२१ मध्ये एल्सेव्हियरमध्ये प्रकाशित केलेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोकण प्रदेशातील अतिवृष्टीचे एक हॉटस्पॉट दक्षिणेकडे सरकले आहे. ज्याचे संभाव्य परिणाम घातक असू शकतात.

भारतीय हवामान विभाग हवामान केंद्रांनी त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड, वायनाड, कन्नूर, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये १९ सेमी ते ३५ सेमी दरम्यान पावसाची नोंद केली आहे. 

केरळसह महाराष्ट्रातही कमी वेळात जास्त पाऊस

हवामान विभागाने १ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला. केरळमधील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे, मान्सूनची पद्धत अनियमित झाली आहे आणि कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या पश्चिम घाटात दरड कोसळण्याच्या आणि पुराच्या घटना वारंवार घडत आहेत.

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस