शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहा तान्ह्या बाळांसह १६ मुलांचा यूपीत मृत्यू ,गोरखपूर हॉस्पिटल; वर्षभरात ३१0 दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:11 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या

लखनौ : गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.२० रुग्ण हे (सहा देवरियाचे, दोन कुशीनगरचे, गोरखपूर व महाराजगंजचे प्रत्येकी चार आणि बस्ती व बलरामपूरचा प्रत्येकी एकेक) मेंदूला आलेल्या सूजेनंतर गेल्या २४ तासांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३६ रुग्णांवर (त्यातील बहुतेक हे मेंदूला सूज आलेले आहेत) बाबा राघव दास महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पाच रुग्ण बिहारचेही आहेत.अधिकाºयांनी सांगितले की, १,४७० रुग्ण या वर्षी जानेवारीपासून या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३१० जणांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालय गेल्या आॅगस्टमध्ये तान्ह्या बाळांसह ६३ मुलांचा मृत्यू अवघ्या एका आठवड्यात झाल्यामुळे चर्चेत आले होते. आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा विक्रेत्याने बिलाअभावी थांबवल्यामुळे हे मृत्यू झाले होते.उशिरा दाखल केले-डॉक्टर म्हणाले की, आता मुलांचे मृत्यू हे आॅक्सिजनच्या टंचाईमुळे, उपचारांअभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेले नाहीत. त्यांची प्रकृती खूप गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याने तेदगावले आहेत.आॅगस्टमधील मृत्यूनंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पदावरून दूर करण्यात आले होते व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यावर ते म्हणाले होते की, हे राज्य १९७० पासून मेंदूला सूज येण्याच्या आजाराला तोंडदेत आहे.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूरhospitalहॉस्पिटल