शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:34 IST

३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

अहमदाबाद : देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. त्यातही गुजरातमध्येपूरस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जून महिन्यापासून देशभरात २२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आतार्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. एकट्या गुजरातमध्येच गेल्या चार दिवसांमध्ये ८३ जणांचा अतिवृष्टीमुळे  वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, साेमनाथ हे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नवसारीमध्ये वांसडा तालुक्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी अनेक भागात गुडघाभर पाणी आहे. पुरामुळे मुंबई-अहमदाबाद आणि नागपूर-सूरत महामार्ग बंद करण्यात आला आहे. वलसाडमध्ये कापरादा आणि धर्मापूर तालुक्यात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. 

अहमदाबादजवळ तीन महिलांचा मृत्यूअहमदाबाद शहराजवळ ओगनाज भागात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला मजूर व एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या महिला तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये राहत होत्या. 

मध्य प्रदेशमध्ये नर्मदा धोक्याच्या पातळीवरमध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत ६६ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये २२ इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य प्रमाणापेक्षात ११ इंच जास्त पाउस या ठिकाणी झाला आहे. इंदूरमध्येही गेल्या २४ तासांत ३ इंच पाउस पडला आहे. 

राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारीराजस्थानमध्ये बांसवाडा, झालावाड, भीलवाडा, अलवर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ इंच पावसाची नोंद झाली. सिरोही आणि उदयपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तेलंगणामध्ये शाळा, महाविद्यालयांना १६ जुलैपर्यंत सुट्टीतेलंगणामध्येही मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची सुट्टी १६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात गंगा नदीमध्ये ४ जण वाहून गेले. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस