शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

१७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 11:46 IST

Organ Donation : सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या.

राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर(Dholpur) जिल्ह्यातील गंगा दास गावातील १७ वर्षीय मुलाचं निधन झालं नाही तर तो अमर झाला आहे. त्याच्या कुटुंबियांनी तो ब्रेनडेड झाल्यावर सेवारामचे अवयव दान(Organ Donation) केले. ज्यामुळे पाच लोकांनी जीवनदान मिळालं आहे. त्यामुळेच सेवाराम (Sewaram) मरण पावला नाही तर तो अमर झाला आहे.

सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या. त्याचे आई-वडील आता पाच लोकांमध्ये आपला मुलगा बघतील. आई-वडिलांनी मोठ्या गर्वाने आपल्या मुलाचं नाव सेवाराम ठेवलं होतं. तो मरता मरताही त्या नावाला खरं ठरवून गेला.

धौलपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय सेवारामची १६ फेब्रुवारीला बाइक स्लीप झाली होती. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नंतर त्याला ग्वालिअरला घेऊन गेले. पण तरी त्याची तब्येत काही सुधारली नाही. नंतर त्याला जयपूरमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इथे त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. (हे पण वाचा : हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!)

डॉक्टरांनी सेवारामच्या कुटुंबियांना समजावलं आणि अवयव दान करण्याचा सल्ला दिला. यावर त्याचे कुटुंबिय तयार झाले. ज्यामुळे पाच लोकांना जीवनदान मिळाले आहे. अवयव दान केल्यानंतर सोमवारी एसएसएस हॉस्पिटलमध्ये जयपूरच्या चिकित्सा टिमने त्याला शहीदाचा दर्जा देत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. इतकेच नाही तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून सेवारामच्या कुटुंबियांचे आभार मानले. (हे पण वाचा : VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!)

सेवारामचं पार्थिव जेव्हा गावात पोहोचलं तेव्हा एकीकडे दुखंही वाटत होतं तर दुसरीकडे त्याचा अभिमानही वाटत होता. कारण त्यांच्या सेवारामने जाता जाता ५ लोकांचा जीव वाचवला होता. जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये प्रदेशातील हे ४२ वं अवयव दान आहे. सेवारामचं हार्ट, लिवर, लंग्स आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या.

डॉक्टर समरवीर सिंह म्हणाले की, जिल्ह्यासाठी ही फार गर्वाची बाब आहे. १७ वर्षीय मुलगा अपघातात जखमी झाला होता. त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्याची स्थिती गंभीर होती म्हणून त्याला हायर सेंटरला रेफर करण्यात आलं. पण त्याचे नातेवाईक त्याला ग्वालिअरला घेऊन गेले. ग्वालियरमध्ये त्याला एसएमएस हॉस्पिटलमध्ये भरती केली. अखेरचा श्वास घेत त्याने जाता जाता ५ लोकांना नवं जीवन दिलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानOrgan donationअवयव दान