शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

जि.प.घडविणार सरपंचांना पाटोद्याचा दौरा १७८ गावांना संधी : स्वच्छता विभागातर्फे निधीची तरतूद

By admin | Published: March 30, 2016 10:21 PM

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्‍यावर नेले जाणार आहे.

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्‍यावर नेले जाणार आहे.
त्यासंबंधी विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी व इतर वरिष्ठांना जि.प.तर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. या दौर्‍यासाठी जि.प.तर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून निधीची व्यवस्था केली जाणार आहे.
एकाच वेळी शक्य आहे तेवढ्या अधिक सरपंच व ग्रामसेवक यांना पाटोदा येथे पाठविले जाईल. या वृत्तास अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी दुजोरा दिला आहे.

साक्री पं.स.कडून करवून घेणार भूमीगत गटारी
सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी प्रस्तावित गावांमध्ये भूमिगत गटारी बांधण्यासाठी साक्री ता.धुळे येथील पं.स.चे पदाधिकारी, अभियंता व काही ग्रा.पं.च्या सरपंचांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक गावात भूमिगत गटारी व शोषखड्ड्याचा कार्यक्रम घेतला जाईल. त्यासाठी प्लास्टिकचे मोठे पाईप वापरले जातील. साक्री तालुक्यात भूमिगत गटारी बांधकामाचा पॅटर्न निर्माण केला आहे. तेथील अधिकारी व काही सरपंचांनी नुकतेच जिल्हाभरातील १७८ ग्रा.पं.च्या सरपंचांना भूमिगत गटारी किंवा सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शनही केले आहे.

असे आहे पाटोदा गाव
पाटोदा हे औरंगाबाद जिल्‘ातील साधारणत: पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला निर्मल, आदर्श गाव असे सर्वच प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते दोन वेळेस गौरव झाला आहे. गावात प्रत्येक घराला रोज २० लीटर शुद्ध पाणी ५ पैसे दरात दिले जाते. सकाळी गरम पाणी अंघोळीसाठी सोडले जाते. गावात १०० मीटर अंतरावर कचरा कुंड्या व थुंकीपात्र, गुळण्या करण्यासाठी बेसीन आहेत. सर्व गल्ल्यांमध्ये पेव्हर असून, प्रत्येक घरात शौचालय आहे. धुणे धुण्यासाठी चार घाट बांधले आहेत. राज्याच्या तीन तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या गावास निधी प्रदान केला आहे. मंत्रालयातील एक हजार कर्मचार्‍यांनी या गावास अभ्यासासंबंधी भेट दिली आहे.