शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारतीय जवानांची १९ तास पायपीट, चिनी सैनिकांना हुसकावले, अरुणाचल प्रदेशात रस्त्यांची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:15 IST

अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागात चिनी सैनिक घुसखोरी करीत असल्याचे कळताच भारतीय जवानांनी अतिशय वाईट रस्त्यांवरून १९ तास पायी प्रवास करून सीमेवर मजल मारली आणि चिनी सैनिकांना हुसकावले, असे उघड झाले आहे.

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागात चिनी सैनिक घुसखोरी करीत असल्याचे कळताच भारतीय जवानांनी अतिशय वाईट रस्त्यांवरून १९ तास पायी प्रवास करून सीमेवर मजल मारली आणि चिनी सैनिकांना हुसकावले, असे उघड झाले आहे.चीन सीमेवरील तवांग, सिंयांग या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, वाहनांतून तिथे पोहोचणे अवघडच असते. तुतिंग हा भाग सियांग जिल्ह्यातील असून, तिथेही वाहनाने जाण्यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे भारतीय जवानांना तुतिंगपर्यंत चालत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. चिनी तुतिंग भागात २८ डिसेंबर रोजी घुसखोरी केली होती. तिथे रस्ता बांधण्यासाठी ते आले होते आणि सोबत त्यासाठीची साधनसामग्रीही त्यांनी आणली होती.तुतिंग भागातील एका हमालाने चिनी सैनिक घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाºयांना दिली. त्यानंतर लगेचच भारतीय जवानांना तिथे पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या. तुतिंग हे सियांग जिल्ह्यात असून, तेथील रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण असल्याने जवानांनी तिथे पायी पोहोचण्याचेच ठरवले. अतिशय संवेदनशील भागांतील रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. पण संपूर्ण अरुणाचल प्रदेशातील रस्त्यांची अवस्था वाईट असून, सियांग व तवांग येथील रस्ते तर वाहने जातील, असेही नाहीत. (वृत्तसंस्था)रसद नेण्यासाठी ३00 हमालआजच्या स्थितीत १२० भारतीय जवान तिथे असून,त्यांना एका महिन्यासाठीचे अन्नधान्य देण्यात आलेआहे. ही रसद घेऊन जाण्यासाठी ३00 हमालांची मदत घेण्यात आली. तसेच जवान पोहोचण्याआधी जेवणाची१००० पाकिटे व थंडीत शरीरामध्ये ऊ र्जा निर्माण करण्यासाठी काही हजार चॉकलेट पाकिटे तिथे हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आली.- तेथील रस्ते तर वाईट आहेतच, पण अनेक नद्यांवरील पूलही कच्चे आहेत. त्यावरून वाहन नेणे तर सोडाच,पण चालत जाणे हीसुद्धा कसरतच असते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान