शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:11 IST

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला.

ठळक मुद्देलोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

नवी दिल्ली - देशातील सत्तांतर होऊन 7 वर्षे झाल्यानंतर मोदी सरकारने आपल्या कामकाजाचे लेखाजोखा सोशल मीडियातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून मोदींच्या कार्यकाळात देशाने केलेल्या विकासाची गाणी गायली केली. मोदी सरकारच्या 7 वर्षीय कामाची तुलना काँग्रेसच्या 70 वर्षांसोबतही करण्यात आली. विशेष म्हणजे मोदी सरकार 2 मध्ये देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच, कोरोना महामारीने जनता त्रस्त झाली. तरीही, भाजपा नेत्यांनी विकासाचे गोडवेच गायले. याबाबत लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकार 2 काळातील कार्यासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे.

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून 2019 मध्ये सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून आजतागायत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी पैशांची जमावजमव केली जात असतानाच, दुसरीकडे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने देशाचं अर्थकारण बिघडलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्य दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला आहे. यासंदर्भातच लोकमत डॉट कॉमने मोदी सरकार 2 - कार्यकाळ अन् सर्वसामान्यांचे जीवन, यास अनुसरुन लोकमताच कौल घेतला आहे. 

लोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

होय, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महागाई वाढली की घटली? असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. त्यावर, मोठ्या प्रमाणात वाचकांनी सहभाग घेऊन आपलं स्पष्ट मत मांडल. त्यानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई वाढल्याचे मत 68.45 टक्के वाचकांनी मांडले आहे. महागाई घटल्याचे 13.45 टक्के वाचकांना वाटते. तर, महागाई जैसे थेच असल्याचे 18.08 टक्के वाचकांनी म्हटले आहे. त्यामुळे, एकंदरीचा जनताचा कौल मोदी सरकारच्या विरोधात असून जवळपास 69 टक्के वाचकांनी महागाईत वाढ झाल्याचे रोखठोक मत मांडले आहे. 

होय, मोदी सरकारच्य काळात अर्थव्यवस्था मंदावली...

लोकमतच्या सर्वेक्षणात दुसरा प्रश्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात होता. मोदी सरकार 2 च्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याही प्रश्नावरील सर्वेक्षण वाचकांना चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार, 57.68 टक्के वाचकांनी मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं मत नोंदलं आहे. 33.49 टक्के लोकांना वाटते, अर्थव्यवस्था सुधारली आहे. तर, 8.84 टक्के लोक या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे, मोदी सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं जनमत स्पष्ट दिसून आहे.

लोकमतच्या सर्वेक्षणातून वाचकांनी मोदी सरकार 2 च्या कामगिरीवर नाराजी दर्शवली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि महागाई या परस्परपूरक बाबी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे, वाचकांना सजग नागरिक असल्याचं दाखवत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे, मोदी सरकारला पुढील 3 वर्षात महागाई कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची वाटचाल सुधारणेसाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, तेच मोदी सराकरपुढे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याLokmatलोकमतEconomyअर्थव्यवस्थाInflationमहागाई