शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?

By admin | Published: September 22, 2016 1:26 AM

भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत,

नवी दिल्ली, दि. 22 - उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय लष्करानं आता मोहीम उघडली आहे. भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, असं वृत्त द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराच्या कोणत्याही प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या हल्ल्यात आतापर्यंत 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराच्या दोन पॅरा फोर्सनं हा हल्ला केला आहे. भारतीय लष्कराच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या या पॅरा फोर्समध्ये जवळपास 18 ते 20 जवान असल्याचं समजतं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त करून 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात 200हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते आहे. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं केला आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराचा कोणत्याही सूत्रांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. क्विन्टच्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीएआय)नं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांमधून विमानसेवाही रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डू या शहरांची सेवा याच कारणास्तव खंडित केल्याची माहिती क्विन्टनं दिली आहे.