शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:39 IST

भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल.

नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. विधानसभेत जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कक्षात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात तब्बल 20 मिनिटं राजकीय चर्चा झाली. त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

तेजस्वी-नितीश कुमार यांच्या भेटीनंतर बिहारमध्ये एनआरसी लागू न करण्यावर आणि 2010 च्या नियमांनुसार एनपीआर सभागृहात सर्वसंमतीने पास करून घेण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यांच्यात बैठक झाली. यावेळी आरजेडीचे नेते अब्दुल सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार अवधेश नारायण सिंह उपस्थित होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी तीनही नेत्यांसमोर आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तेजस्वी यांनी देखील नितीश कुमारांना एनपीआरसह एनआरसीविरुद्ध प्रस्ताव पास करण्याचा सल्ला दिला. यावर नितीश कुमारांनी ताबडतोब संमती दिली. त्यानंतर नितीश कुमारांनी दोन्ही प्रस्ताव विधानसभेत पारित केले.

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार ?नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या भेटीने पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र येणार असं चित्र बिहारमध्ये निर्माण झाले आहे. नितीश कुमार देखील एनआरसीवरून नाराज आहेत. मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावतील, अशी त्यांना भिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तसेच प्रस्ताव मंजूर करून नितीश कुमारांनी आपण भाजपसोबत असलो तरी मुस्लिमांच्या अधिकारासाठी तत्पर असल्याचा मॅसेज दिला. 

भाजपमध्ये नाराजीभाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल. मात्र भाजपला एनआरसीपेक्षा तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट त्रासदायक वाटत आहे.