शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

सर्जिकल स्ट्राइकमध्ये तोयबाचे २० अतिरेकी ठार

By admin | Published: October 10, 2016 5:31 AM

उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने केला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद हाच तोयबाचा प्रमुख आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यात जी चर्चा झाली आहे त्यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तोयबाचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. भारतीय सैन्याकडून अशी काही कारवाई होईल, याची पुसटशी कल्पनाही या अतिरेक्यांना नव्हती. त्यामुळे या कारवाईने ते थक्कच झाले. भारतीय सैन्याने या अतिरेक्यांना मारण्यास सुरुवात केली तेव्हा हे अतिरेकी त्यांच्या चौकीकडे पळताना दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची वाहने आली आणि त्यांनी हे मृतदेह अज्ञात स्थळी नेले. सिमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आमचे दोन सैनिक ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

भांडवल करू नका-

 ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भाजपा करीत असल्याचा आरोप, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.

भारताचा भाग ताब्यात घ्या - रामदास आठवले च्अमरावती : उरी घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून देशाची शान वाढविली आहे. मात्र, आता शत्रूला धडा शिकविण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरातील भारताचा भाग ताब्यात घ्यावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी व्यक्त केले.अमरावती येथे आयोजित बुद्ध महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरसंघचालकांकडून समर्थन-नागपूर : उरी येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरून देशभरातील राजकारण तापत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या लष्करी कारवाईचे स्वागत केले आहे. आपल्याकडे किती शक्ती आहे हे ती दाखविल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे शक्ती दाखविणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आज जग आपल्यासोबत उभे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. नागपुरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.