शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

आठ स्मार्ट सिटींसाठी २ हजार कोटी, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर; राज्यात उच्चाधिकार सुकाणू समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 9:48 AM

smart cities : देशात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ४८ हजार १५० कोटींचा निधीतून २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण करण्यात आले. २५ जून २०१५ पासून सरकारने १०० शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी हे उपक्रम सुरू केले.

- विकास झाडेनवी दिल्ली : २०१५ नंतर मोदी सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमात किती शहरे ‘स्मार्ट’ होऊ शकले, हा संशोधनाचा विषय असला तरी महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्राने दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी दिला आहे. स्मार्ट सिटीसाठी राज्यस्तरावर उच्चाधिकार सुकाणू समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी दिली.देशात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ४८ हजार १५० कोटींचा निधीतून २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण करण्यात आले. २५ जून २०१५ पासून सरकारने १०० शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी हे उपक्रम सुरू केले. जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात ४ टप्प्यांमध्ये १०० स्मार्ट सिटींची निवड केली. या शहरांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आल्याचा दावाही केंद्र सरकारने केला आहे.केंद्र सरकारने केंद्राचा हिस्सा म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २३९२५ कोटी ८३ लाख रुपये जारी केले आहेत, त्यापैकी २०४१० कोटी १४ लाख म्हणजेच ८५ टक्के रक्कम स्मार्ट सिटींसाठी उपयोगात आणली आहे.

काय आहे राज्यातील शहरांची स्थिती?महाराष्ट्रातील आठ स्मार्ट सिटींसाठी आतापर्यंत २१२८ कोटी २३ लाखांचा निधी दिला आहे. यातील १९२० कोटी ९२ लाखांचा निधी उपयोगात आणला गेला. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी- चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांची स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी निवड झाली होती. या शहरांच्या विकासासाठी ९० टक्के निधी उपयोगात आणला आहे.

- ९ जुलै २०२१ पर्यंत या शहरांसाठी १ लाख ८० हजार ८७३ कोटींचा ६ हजार १७ प्रकल्प निविदा काढण्यात आल्या. यापैकी १ लाख ४९ हजार २५१ कोटींच्या ५ हजार ३७५ प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी केले आहेत. यापैकी ४८ हजार १५० कोटींचे २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण झाले.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी