शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर", दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:45 IST

Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

Suvendu Adhikari : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील विजयामुळे भाजप नेत्यांनी जल्लोष केला. तर पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीचा विजय आमचा आहे, २०२६ मध्ये बंगालचा नंबर येईल.  दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. दिल्लीप्रमाणे बंगालमध्येही भाजपची लाट येईल आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर आरोप करत म्हटले की, बंगालमधील पोलिसांचा वापर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी केला जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय हा भ्रष्टाचार आणि खोट्या राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे. आपच्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात केला आणि भ्रष्टाचारात गुंतले, ज्याचे दिल्लीच्या जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. तसेच, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर बनवायला हवी होती, पण आपने ती उद्ध्वस्त केली, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात ज्या पद्धतीने विकास झाला आहे, तोच विकास दिल्लीतही व्हायला हवा होता, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने यमुना एक्सप्रेसवे आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या, परंतु दिल्ली सरकार त्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले. याशिवाय, निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक बंगाली मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचा दावा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdelhi electionदिल्ली निवडणूकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा