शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

ऑगस्टच्या अतिवृष्टीचा २२८ गावांना फटका, १६ हजार हेक्टरचे नुकसान

By admin | Published: August 16, 2016 10:24 PM

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षानाशिक : जिल्‘ात १ ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्‘ातील २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांच्या १६ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.दरम्यान, शासनाला नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता ३२ हजार शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान इगतपुरी व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे झाले आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्‘ात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला होता. बागलाण तालुक्यात ३५, कळवण- ५७, नाशिक- ४२, इगतपुरी- १०, चांदवड- ४ अशा एकूण २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांना फटका बसला होता. त्यात भात पिकाची सर्वाधिक लागवड झालेल्या त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यात सुरगाणा तालुक्यात २५ हजार २३७ शेेतकर्‍यांच्या ३८७६ हेक्टरवरील भात, सोयाबीन यांसह अन्य पिके मिळून सुमारे ४५२२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील १० गावांमध्ये ५ हजार २०९ शेतकर्‍यांच्या २६६० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे तसेच वरई, भाजीपालासह अन्य पिकांचे मिळून ३४०६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यातील ५७ गावांमधील १५११ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच बागलाण, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदि तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. आता शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)