शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

गतवर्षीच्या आत्महत्यांत मजुरांचे प्रमाण २४ टक्के; तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:48 IST

Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात वर्षांपूर्वी जितक्या मजुरांनी आत्महत्या केली होती त्यापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशात मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूमध्ये केल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे स्थिती आणखी बिघडली होती. २०१४ साली आत्महत्या केलेल्यांपैकी १२ टक्के लोक मजूर होते. हे प्रमाण २०१५ साली १७.८ टक्के, २०१६ मध्ये १९.२ टक्के, २०१७ मध्ये २२.१ टक्के, २०१८ मध्ये २२.४ टक्के, २०१९ मध्ये २३.४ टक्के इतके होते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० साली तामिळनाडूमध्ये ६,४९५ मजुरांनी आत्महत्या केली होती. तर, मध्य प्रदेशमध्ये ४,९४५, महाराष्ट्रात ४,१७६, तेलंगणामध्ये ३,८३१ व गुजरातमध्ये २,७५४ मजुरांनी आत्महत्या केली आहे. अपघातांमुळे होणारे मजुरांचे मृत्यू व आत्महत्या करणारे मजूर यांची वेगवेगळी नोंद ठेवण्यास एनसीआरबीने २०१४ सालापासून सुरुवात केली. देशात आत्महत्या करणाऱ्या नोंदीची नऊ गटात विभागणी करण्यात येते. रोजंदारीवरील मजुरांप्रमाणेच गृहिणी, शेतकरी, पगारदार तसेच व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त याचबरोबर इतर काही गटांतील लोकांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येते.

आत्महत्या केलेल्या गृहिणींचे प्रमाण १४ टक्केव्यवसायानुरूप विचार केला तर देशात रोजंदारीवरील मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अन्य व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण गृहिणी (१४.६ टक्के), स्वत:चा व्यवसाय असलेले (११.३ टक्के), बेरोजगार (१०.२ टक्के), पगारदार व्यक्ती (९.७ टक्के), विद्यार्थी (८ टक्के), शेतकरी (७ टक्के), सेवानिवृत्त (१ टक्का) व इतर गट (१३.४ टक्के) असे आहे. बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१९ रोजी १०.१ टक्के होते ते २०२० साली १०.२ टक्के झाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू