शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

नेपाळमध्ये बस दरीत कोसळली, जळगावच्या २७ भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 6:45 AM

अयाेध्येला रामकथेसाठी गेले हाेते; पुढे देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

काठमांडू/जळगाव : अयाेध्येला रामकथा आटाेपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत असलेल्या नेपाळमधील मर्त्स्यांगडी नदीमध्ये सकाळी ११ वाजता काेसळली. या अपघातात २७ भाविकांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हाेते. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

वरणगाव (भुसावळ) परिसरातील ४१ भाविक १० दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले हाेते. महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या १०४ भाविकांमध्ये त्यांचा समावेश हाेता.  काठमांडूला बसने (यूपी५३-एफटी७६२३) जात होते. चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल १५० फुट खाेल दरीत काेसळली. त्या बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण उपचारादरम्यान दगावले. बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. 

पंतप्रधान माेदी यांनी व्यक्त केले दु:खनेपाळमधील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शाेक व्यक्त केला. अपघातात भाविकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, अशा शब्दांत माेदी यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे पथक पाठवले : मुख्यमंत्रीनेपाळ दुर्घटनेत जळगावचे काही नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना योग्य ती मदत राज्य शासनाच्यावतीने पोहोचविली जाईल. त्यांच्या मदतीसाठी आमदार व अधिकाऱ्यांना नेपाळ येथे पाठविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

१६ मृतांची ओळख पटलीजळगावमधील २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला राणे (वय ४२), भारती जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप सरोदे (४५), पल्लवी सरोदे (४३), अनुप सरोदे (२२), गणेश भारंबे (४०), नीलिमा धांडे (५७), पंकज भंगाळे (४५), परी भारंबे (८), अनिता पाटील, विजया जावळे (५०), रोहिणी जावळे (५१), प्रकाश कोळी यांचा समावेश आहे.

बेळी (ता. जळगाव) येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी जळगाव आणि तसेच इतर ठिकाणांहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी दोन बसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली. 

मुख्य सचिवांना आदेश : फडणवीसनेपाळ येथील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा समावेश आहे. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय केला असून सगळी मदत देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यू.पी. सरकारच्या माध्यमातून मृतदेह आणले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मदतकार्यात अडथळे : गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांचा प्रवाह आणखी वेगवान झाला असून बचावकार्य जिकिरीचे झाले आहे.

दूतावासाशी संपर्क : ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच, नेपाळच्या सीमेवरील उत्तर प्रदेशच्या  महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 

टॅग्स :NepalनेपाळAccidentअपघात