शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

देशात २.८ कोटी खटले प्रलंबित

By admin | Published: January 16, 2017 4:56 AM

देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत.

नवी दिल्ली : देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. आता १५ हजारांहून अधिक न्यायाधीशांची नियुक्ती करून या संकटातून बाहेर पडता येईल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन अहवालांत करण्यात आली आहे. ‘इंडियन ज्युडिशिअरी अ‍ॅन्युअल रिपोर्ट २०१५-२०१६’ व ‘सबआॅर्डिनेट कोर्टस आॅफ इंडिया : अ रिपोर्ट आॅन अ‍ॅक्सेस टू जस्टीस २०१६’ या अहवालांत सूचना आहेत. देशातील जिल्हा न्यायालयांत एक जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीत दिवाणी आणि फौजदारी मिळून दोन कोटी ८१ लाख २५ हजार ६६ खटले प्रलंबित आहेत, असे अहवालात म्हटले आहे. याच कालावधीत एक कोटी ८९ लाख चार हजार २२२ खटले निकालीही निघाले आहेत. दुय्यम न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची कमी संख्या हेच खटले प्रलंबित राहण्यामागील अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण आहे व तो काळजीचाही विषय आहे. दुय्यम न्यायालयांसाठी २१ हजार ३२४ जागा मंजूर असून ४ हजार ९५४ न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत. याविषयी केलेला अभ्यास आणि भविष्यात वाढणाऱ्या खटल्यांचा विचार करून सध्याची न्यायाधीशांची संख्या ही त्या तुलनेत अपुरी आहे. अतिरिक्त न्यायालयीन मनुष्यबळ आणि पूरक कर्मचारी वर्ग तसेच पायाभूत सुविधा असेल, तरच ही परिस्थिती हाताळता येईल, असे हा जिल्हा न्यायालयांवरील अहवाल म्हणतो. वरिष्ठ न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून कार्यकारी सत्ता आणि न्यायपालिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहता सरकारला या प्रश्नाला हाताळण्यात अपयश आल्याचे तीव्र शेरे अहवालात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) >21324 जागा दुय्यम न्यायालयांसाठी मंजूर >4954 न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत