शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

29000 कोटींचा कोळसा घोटाळा, अदानी समूहाची चौकशी

By admin | Published: April 07, 2016 6:23 PM

इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये किंवा 4.4 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड असल्याचा अंदाज आहे. या घोटाळ्यात एकूण 40 कंपन्या असून यामध्ये अदानी समूहाच्या सहा कंपन्यांचा व अनिल अंबानींच्या कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जाणाऱ्या गौतम अदानींच्या कंपन्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल का अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
या संदर्भातले वृत्त प्रथम इकॉनॉमक अँड पॉलिटिकल वीकलीने याबाबत वृत्त दिले असून केंद्रीय अर्थखाते भारतातल्या 40 ऊर्जा कंपन्यांची चौकशी करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पॉवर राजस्थान, अदानी पॉवर महाराष्ट्र, अदानी विल्मर, व्योम ट्रेड या कंपन्यांचा समावेश आहे. या समूहाने वेगवेगळ्या राज्यांच्या ऊर्जानिर्मिती कंपन्यांना आयात कोळसा पुरवला आहे. 
याखेरीज अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरचीही चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त ईपीडब्ल्यूने दिले आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या प्रकरणांची चौकशी करत असून फेब्रवारीमध्ये मनोज कुमार गर्ग यास अटक करण्यात आली. इंडोनेशियातून आयात कोळसाची किंमत जास्त दाखवून जवळपास 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
वीजेचे दर निश्चित करताना अनेक घटकांबरोबच कच्च्या मालाची, म्हणजे कोळश्याची किंमत महत्त्वाची असते. हेच दर कृत्रिमरीत्या फुगवल्याने सर्वसामान्य ग्राहकांची हजारो कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला आहे. 
विशेष म्हणजे इंडोनेशियातून थेट कोळसा आयात झाला असला तरी बिलं मात्र अन्य देशांच्या मार्फत आल्याचे दाखवल्याने आर्थिक अफरातफरीची शक्यताही डीआरआय पडताळत आहे.
 
 
भारताने 2014-15 मध्ये 212.11 दशलक्ष टन इतका कोळसा आयात केला, ज्याची किंमत 1.04 लाख कोटी रुपये होती. यामध्ये नक्की किंमत किती होती, आणि वाढवून किती लावली होती हे चौकशीअंती स्पष्ट होईल.
केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी इंडोनेशियातून आयात केलेल्या व एनटीपीसीला वितरीत केलेल्या कोळशाची किंमत वाढवून लावली होती का याची चौकशी करत असल्याचे डीआरआयने कळवल्याचे मान्य केले आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची निष्पक्ष चौकशी या कोळसा घोटाळ्यात मोदी सरकार करेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.