शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

2 जी घोटाळयाचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपवणार, करुणानिधी मोदींबरोबर राजकीय मैत्री करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:38 IST

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं.

ठळक मुद्देद्रमुकची बदनामी करण्यासाठी 2 जी घोटाळयाचे कुंभाड रचण्यात आले अशी प्रतिक्रिया द्रमुकचे नेते स्टालिन यांनी निकालानंतर दिली. ष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांशी दोन हात करण्याचा द्रमुकचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली- 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं. या प्रकरणात ए.राजा आणि करुणानिधी यांची कन्या कणिमोळी आरोपी असल्यामुळे तामिळनाडूत द्रमुकला याची जबर किंमत चुकवावी लागली. विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले होते. पण आता न्यायालयाच्या निकालामुळे फक्त कणिमोळी आणि राजा यांना नवीन राजकीय आयुष्य मिळणार नसून राज्य आणि केंद्रामध्येही काही समीकरणे बदलू शकतात. 

द्रमुकची बदनामी करण्यासाठी 2 जी घोटाळयाचे कुभांड रचण्यात आले अशी प्रतिक्रिया द्रमुकचे नेते स्टालिन यांनी निकालानंतर दिली. या निकालामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांशी दोन हात करण्याचा द्रमुकचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच काँग्रेस आणि भाजपा दोघेही द्रमुकला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करु शकतात. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळयावरुन पक्ष अडचणीत असताना काँग्रेस ठामपणे द्रमुकच्या मागे उभा राहिला नव्हता. आता मात्र काँग्रेस द्रमुकशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करेल. 

पुढच्यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकासह आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून द्रमुक काँग्रेस किंवा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकते असे राजकीय विश्लेषक ग्नानी संकरण यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईमध्ये जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली होती. आता पर्यंत द्रमुकने कधीच भाजपाला साथ दिलेली नाही. पण देशातील बदलती राजकीय स्थिती आणि 2 जी स्पेक्ट्रमचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आणू शकतो.             

अशी झाली सुटका                                                                          2 जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाने गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा हा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे. 

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळाcongressकाँग्रेसBJPभाजपा