शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

३ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं; ४८ लोक तर पाकिस्तानात गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 1:19 PM

ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे.

नवी दिल्ली - मागील ३ वर्षात ३.९२ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. विशेष म्हणजे भारताच्या या नागरिकांनी १२० देशातील नागरिकत्व स्वीकारलं. त्यात सर्वात जास्त १.७० लाख लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. इतकेच नाही ४८ जणांनी भारत सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व घेतल्याचंही संसदेत समोर आले. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे. या लोकांनी त्यांच्या खासगी कारणांसाठी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत छापील उत्तरात सांगितले की, २०१९, २०२० आणि २०२१ या काळात ३ लाख ९२ हजार ६४३ लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यातील १ लाख ७० हजार ७९५ लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. 

तर ६४ हजार ७१ लोकांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतले. ५८ हजार ३९१ लोकांनी ऑस्ट्रेलिया, ३५ हजार ४३५ लोकांनी यूके, १२ हजार १३१ लोकांनी इटली, ८ हजार ८३२ लोकांनी न्यूझीलँडचं नागरिकत्व स्वीकारलं. त्याशिवाय ७ हजार ४६ लोकांनी सिंगापूर, ६ हजार ६९० लोकांनी जर्मनी, ३ हजार ७५४ लोकांनी स्वीडन आणि ४८ जणांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. २०२१ मध्ये म्हणजे मागील १ वर्षात १ लाख ६३ हजार ३७० लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यात सर्वाधिक ७८ हजार २८४ जणांनी अमेरिकेचं आणि २३ हजार ५३३ जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व घेतलं. 

याआधी एका आरटीआय उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील ५ वर्षात ६ लाखाहून अधिक लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची माहिती दिली. २०१७ ते २०२१ या काळात ६ लाख ८ हजार १६२ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. अंदाजे सरासरी वर्षाला १ लाख २१ हजार ६३२ जण भारताचं नागरिकत्व सोडतात. तर ५ वर्षात ५ हजार २२० परदेशी नागरिकांना भारतानं नागरिकत्व दिले आहे. त्यात ८७ टक्के पाकिस्तानातून आलेले ४५५२ जणांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी १ हजार जणांना भारतीय नागरिकत्व दिले जाते. भारताचं नागरिक बनण्यासाठी सर्वात पुढे पाकिस्तान आहे. २०२१ या काळात १७४५ परदेशी लोकांनी भारताचं नागरिकत्व घेतले त्यात १५८० पाकिस्तानातून आलेल्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान