शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

रेल्वे स्टेशनवर 1 रुपयात मिळणार 300 मिली पाणी

By admin | Published: June 06, 2016 4:59 PM

रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभारण्यात आले असून फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 - तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे, समोर पाणपोई आहे मात्र त्याची अस्वच्छता पाहून तुम्ही नाक मुरडता आणि मनात नसतानाही 10 ते 20 रुपये देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करता...हा अनुभव सर्वच रेल्वे प्रवाशांना एकदा तरी आलेला असतोच. मात्र रेल्वेने प्रवाशांसाठी आता फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे. 
 
 
रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) याची जबाबदारी घेतली आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना कमी दरात स्वच्छ पाणी मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रवाशांना देण्यात येणा-या पाण्याची आरओ मेकॅनिझमच्या (पाणी स्वच्छ करण्याचं तंत्र) सात टप्प्यांमध्ये चाचणी करण्यात आली असून पुर्णपण जंतूमुक्त असणार आहे.
 
हे मशिन एटीएमप्रमाणे असणार - 
हे मशीन एटीएम मशिनप्रमाणे असणार असून यामध्ये पैसे टाकल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. या मशीनमध्ये दोन पर्याय असून एकामध्ये केवळ पाणी उपलब्ध होईल. पण जर तुमच्याकडे पाणी भरुन घेण्यासाठी काही साधन नसेल तर दुसर्‍या पर्यायामधून बाटलीबंद पाणी विकत घेऊ शकता. 300 मिली पाण्यासाठी प्रवाशांना 1 रुपया, अर्धा लिटर पाण्यासाठी 3 रुपये, एक लीटर पाण्यासाठी 5 रुपये, 2 लीटर पाण्यासाठी 8 रुपये आणि 5 लीटर पाण्यासाठी प्रवाशांना 20 रुपये मोजावे लागणार आहेत. 
सध्या ही सेवा दिल्लीमधील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आणि कानपूर रेल्वे स्थानकावर पुरवली जात आहे.  रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (आयआरसीटीसी) या मशीन बसविण्याची जबाबदारी सोपवली आहे.  प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मात्र या पाणपोईंची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई असल्या तरी त्याला नळ नसणे, अस्वच्छता अशा गोष्टींमुळे रेल्वे प्रवासी दहा ते वीस रुपये खर्च करुन बाटलीबंद पाणी खरेदी करतात. 
 
 
मुंबईमध्ये देखील रेल्वे स्थानकांवर या वॉटर मशिन्स बसवण्यात येणार आहेत. आयआरसीटीसी बोरिवली आणि खार स्थानकात हाय-टेक वॉटर एटीएम मशीन बसवणार आहे. या मशीनची चाचणी झाल्यानंतर त्या रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येतील. यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई विभागात या मशीन बसवण्यात येणार आहेत.