शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

३०० वर्षे जुने उर्दू महाभारत लखनौतील मंजुल कुटुंबाकडे

By admin | Published: October 02, 2015 11:29 PM

जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल

लखनौ : जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे ३०० वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत होय. पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता. तो परंपरेने फरमान यांच्याकडे चालत आला. विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे. फरमान यांची आई शहीन अख्तर यांनी या ग्रंथाची कहाणी सांगताना गेल्या पाच पिढ्यांपासून त्याचे जतन कुटुंबासाठी लाभदायी मानले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ कुठेतरी हरविला होता, असे फरमान यांनी सांगितले. या कुटुंबाचे मित्र ‘कारी’ (धार्मिक शिक्षक) वहीद अब्बास यांनी हे पुस्तक तपशीलवार वाचले आहे. हे गंगा- जमुना परंपरेचे प्रतीक असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन केले जावे, असे ते म्हणाले. हाजी तलीब हुसेन आणि त्यांचे मित्र दुर्गाप्रसाद यांनी उर्दू वाचकांसाठी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे मूळ शिया इमाम हजरत अली नक्वी यांनी जतन केलेल्या पुस्तकांमध्ये आढळून येते, ते नंतर मंजूल कुटुंबाकडे आले. हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे, असे अब्बास यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)