शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:12 IST

Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

Andhra Pradesh, Telangana Rain : हैदराबाद/विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग या वाहतुकीच्या साधनांचेही नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

तेलंगणामध्ये १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला. तेलंगणातील समुद्रमजवळ रेल्वे रुळाखालील खडीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. आंध्र प्रदेशात जवळपास साडेचार लाख लोकांना याचा फटका बसला आहे. विजयवाडामध्ये दुधासह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पलानाडू, बापटला आणि प्रकाशम यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक भागांत २४ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकाशम बॅराजमधून ११.३ लाख क्युसेक पुराचे पाणी सोडण्यात आले.

तेलंगणात १६ जणांचा मृत्यूयाशिवाय, तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी सुरुवातीला ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. राज्य सरकारने केंद्राकडे तात्काळ दोन हजार कोटी रुपयांची मदत मागितली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाधित भागांना भेटी देऊन पूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. 

पिकांचेही मोठे नुकसानराज्याचे आयटी आणि उद्योग मंत्री डी. श्रीधर बाबू म्हणाले की, नुकसानीचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण माहिती कळू शकेल. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल सरकार केंद्राला सादर करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खम्ममच्या पूरग्रस्त भागात घरातील साहित्य वाहून गेल्याची दृश्ये समोर आली आहेत. 

४३२ रेल्वे गाड्या रद्ददक्षिण मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या तर १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही राज्यांतील संततधार पावसामुळे काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळली असून पाच गाड्या अडकून पडल्या आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाRainपाऊस