शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

मध्यप्रदेशात २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू...!

By admin | Published: January 03, 2017 4:01 AM

एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले

भोपाळ : एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. शिकार, आपसातील लढाई आणि नैसर्गिक कारणे यासह विविध कारणांमुळे वाघ मृत्युमुखी पडले.गेल्या ५ वर्षांत मध्यप्रदेशात ११ छाव्यांसह ८९ वाघांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये १६ वाघांचा मृत्यू झाला, तर २०१३ मध्ये ११ वाघ मृत्युमुखी पडले. २०१४ मध्ये १४, २०१५ मध्ये १५ आणि २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू झाला. २०१२ पासून २०१५ पर्यंत दरवर्षी सरासरी १४ वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी ३३ वाघ मृत्युमुखी पडले. हे प्रमाण गेल्या चार वर्षांतील प्रमाणाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ आपसातील लढाईत मृत्युमुखी पडले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी विष किंवा विजेचा धक्का देऊन ठार मारले. उर्वरित वाघ आजारपण, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत, वन्यजीव कार्यकर्त्याचा आरोपवाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्यास वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हेही एक कारण आहे, असा आरोप वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी केला. या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ हद्दीच्या वादावरून आपसात झालेल्या लढाईत मारले गेले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी शिकार करून, विष देऊन किंवा विजेचा झटका देऊन ठार केले. जर वनविभाग सतर्क राहिला असता, तर या ५२ वाघांचे प्राण वाचविता येऊ शकत होते, असे ते म्हणाले. कोणत्याही वाघाच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरविले जावे, अशी शिफारस केंद्राच्या कृती गटाने २००५ मध्ये केली होती. तथापि, या शिफारशीचे राज्यात पालन झाले नाही. सरकारी अधिकारीच न्यायालयात जबाब फिरवत असल्यामुळे शिकारी सहजपणे सुटतात. शिक्षा झालेल्या शिकाऱ्यांची संख्या नगण्य आहे, असेही त्यांनी सांगितले.