शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोघांनाही ३४-३४ मते, ईश्वरी चिठ्ठीदेखील सिंघवींच्या नावाची, पण राज्यसभेचा नियम उलटा फिरला... हरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:34 IST

How Abhishek Manu Singhavi Lost Rajya Sabha: चिठ्ठी जिंकली तरी सिंघवी कसे काय हरले... भल्या भल्या केसेस जिंकणाऱ्यां सिंघवींच्या आड एक नियम आला... 

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशातच राज्यसभेचा निकाल धक्कादायक लागला असून काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने मातब्बर नेते प्रसिद्ध कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना पराभूत व्हावे लागले आहे. 

काँग्रेसचे सिंघवी आणि भाजपाचे हर्ष महाजन यांना प्रत्येकी ३४-३४ मते पडली होती. यामुळे निकालासाठी ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. भल्या भल्या केसेस जिंकणारे सिंघवी यांच्या नावाची चिठ्ठी निवडली गेली. परंतु, नशीबाचा फेरा एवढा विचित्र होता की नावाची चिठ्ठी येऊनही सिंघवी हरले होते. 

तुम्ही म्हणाल असे कसे झाले... चिठ्ठी जिंकली तरी सिंघवी कसे काय हरले... इकडे ग्राम पंचायत, जिल्हा परिषद किंवा अन्य निवडणुका असोत त्यामध्ये समसमान मते मिळाली तर ईश्वरी चिठ्ठी म्हणजेच ड्रॉ काढला जातो. यामध्ये ज्याच्या नावाची चिठ्ठी आली तो जिंकला असे जाहीर केले जाते. परंतु इथे उलटे आहे. ही राज्यसभेची निवडणूक होती. 

राज्यसभेच्या निवडणुकीत नियम वेगळे आहेत. निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 75(4) अंतर्गत उमेदवारांना समान मते मिळाल्यास ड्रॉ काढला जातो. रिटर्निंग ऑफिसर उमेदवारांची नावे असलेल्या स्लिप एका बॉक्समध्ये ठेवतात. हा बॉक्स हलविला जातो. यानंतर चिठ्ठी काढली जाते. इथपर्यंत सर्व प्रक्रिया सारखीच असते. परंतु यापुढे सगळे बदलते. ज्याच्या नावाची चिठ्ठी य़ेते त्याला पराभूत असे जाहीर केले जाते. नेमके सिंघवींच्या बाबतीत हेच घडले. यामुळे नशीब असूनही पराभव पत्करावा लागला आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश