शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:47 PM

2018 मध्ये जगभरातील 67 टक्के इंटरनेट बंदीच्या घटना एकट्या भारतात

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली होती. मात्र २०१४ पासून देशात आतापर्यंत ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षात सर्वाधिक १३४ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षात जगभरात झालेल्या इंटरनेट बंदीच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास त्यातील तब्बल ६७ टक्के घटना भारतात घडल्या आहेत. तर चालू वर्षात आतापर्यंत ९३ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. शंभरपेक्षा अधिक दिवस जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद होती. आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जवळपास देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आसामसह ईशान्य भारतामधून या आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलनांची तीव्रतादेखील जास्त आहे. त्यामुळेच ईशान्य भारतामधील बऱ्याच भागांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. २०१४ पासून देशभरात करण्यात इंटरनेट बंदीची आकडेवारी इंडिया टुडेनं प्रसिद्ध केली आहे. यानुसार २०१४ पासून आतापर्यंत देशात ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. २०१४ मध्ये सहावेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. यानंतर इंटरनेट सेवा खंडित करण्याचं प्रमाण दुपटीनं वाढू लागलं. २०१५ मध्ये १४ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये ७९ वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. २०१८ मध्ये हे प्रमाण थेट १३४ वर गेलं. चालू वर्षात १५ डिसेंबरपर्यंत देशात ९३ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

टॅग्स :InternetइंटरनेटJammu Kashmirजम्मू-काश्मीर