शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

देशात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी; न्याय संस्थेच्या इतिहासातील ही अतिशय दुर्मीळ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 11:03 IST

अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू व २०० जण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील ४९ दोषींना शिक्षा सुनावली आहे.

अहमदाबाद : २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ दोषींना फाशीची, तर ११ दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे, तर अन्य २८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साखळी बॉम्बस्फोटाची भीषण घटना घडल्यानंतर सुमारे १४ वर्षांनी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 

अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू व २०० जण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील ४९ दोषींना शिक्षा सुनावली आहे. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये अवघ्या ७० मिनिटांच्या कालावधीत २१ भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले. सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले की, ३८ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या करणे) व १२० ब (गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे) या कलमांद्वारे तसेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), तर अन्य ११ आरोपींना यूएपीए कायद्याच्या विविध तरतुदींद्वारे दोषी ठरविण्यात आले.

या दोषी व्यक्तींना विशेष न्यायालयाने २.८५ लाख रुपये व अन्य एकाला २.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये व किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला. फाशी सुनावलेल्या दोषींमध्ये सफदर नागोरी, कयुमुद्दीन कापडिया, झाहीद शेख, शमसुद्दीन शेख आदींचा समावेश आहे. न्याय संस्थेच्या इतिहासातील दुर्मीळ घटना सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले की, याआधी एका खटल्यात २६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यात ३८ दोषींना फाशी सुनावण्यात आली. भारतीय न्याय संस्थेच्या इतिहासातील ही अतिशय दुर्मीळ घटना आहे.नऊ न्यायाधीशांकडून खटल्याचे कामकाजअहमदाबाद साखळी बाॅम्बस्फोट खटला नऊ वेगवेगळ्या न्यायाधीशांनी चालविला. या खटल्याचे कामकाज सर्वप्रथम न्या. बेला त्रिवेदी यांनी पाहिले. त्यांच्याच न्यायालयात बॉम्बस्फोटातील आरोपींवर १५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्या. बेला त्रिवेदी आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ज्यांनी निकाल दिला ते विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी १४ जून २०१७पासून सुरू झाली.चार आरोपींवर अद्याप खटला सुरू नाहीअहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी चार आरोपींना कालांतराने अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावरील खटल्याचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही, असे एका सरकारी वकिलाने सांगितले.

दाेषींमध्ये मुंबई, पुणे, जळगावचे रहिवासी

दोषींमधील मोहम्मद अकबर, फजले रहमान, आसिफ शेख हे पुण्याचे, अफझर उस्मानी, मोहम्मद आरिफ हे मुंबईचे, तर तौसिफ खान पठाण हा जळगावचा मूळ रहिवासी आहे.  आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्यांमध्ये मोहम्मद सादिक शेख (मुंबई), अनिक खालिद सैय्यद (पुणे), तर निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये मोहम्मद झाकिर (ठाणे), मुबीन शेख, मोहम्मद मन्सूर (पुणे) यांचा समावेश आहे.

टॅग्स :GujaratगुजरातBlastस्फोट