शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

देशात रस्ते अपघातात ४०० नागरिक दररोज गमावतात जीव

By admin | Published: April 21, 2016 10:38 AM

२०१५ साली रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात भारतातील रस्ते अतिशय धोकादायक मानले जातात. २०१५ साली यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. इतर वर्षांच्या तुलनेत २०१५ सालात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रमाणात ५ टक्के वाढ झाली असून हा आकडा १.४६ लाखांवर पोचला आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, दर साडेतीन मिनिटांनी एक नागरिक अपघातात मृत्यूमुखी पडतो. 
हा आकडा म्हणजे सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० पर्यंत रस्ते अपघातात जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. 
विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातामुळे जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या सर्वाधिक (१७,६६६) आहे, त्यामागोमाग तामिळनाडूचा (१५,६४२) नंबर लागतो. या यादीत महाराष्ट्र तिस-या (१३,२१२) क्रमांकावर असून राजस्थानमध्ये मृतांचा आकडा १०,५१० इतका असल्याचे समजते. 
दरम्यान मोठ्या राज्यातींल मृतांचा आकडा वाढत असतानाच, १० छोट्या राज्यांसह दिल्ली, चंदीगडसहित केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आसाममध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.