शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी

By ravalnath.patil | Updated: September 22, 2020 14:44 IST

शिवराज सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना आता सन्मान निधी म्हणून १० हजार रुपये मिळणार आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत.भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी या रिक्त जागांवरील कमीत कमी नऊ जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांत पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीपूर्वी येथील शिवराज सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता दर वर्षाला १० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. त्यामध्ये आता मुख्यमंत्री किसान सम्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला दोन हप्त्यामध्ये चार हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे शिवराजसिंह चौहान यांना सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत. भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी या रिक्त जागांवरील कमीत कमी नऊ जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील आगामी पोटनिवडणुका कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नाहीत किंवा केवळ पोटनिवडणूक नाहीत तर 'राज्याचे भविष्य ठरविण्याची निवडणूक' आहे, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पोटनिवडणुकीत विजय मिळावा, यासाठी शिवराज सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीव शिवराज सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना भेट दिली आहे. शिवराज सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना आता सन्मान निधी म्हणून १० हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी शिवराज सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी एक रुपया, पाच रुपये माफ केले होते, त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

शिवराजसिंह चौहान यांचे टेंपररी मुख्यमंत्री विधानमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत: ला टेंपररी (ताप्तुरते) मुख्यमंत्री म्हणण्याचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चौहान रविवारी मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा विधानसभा मतदार संघातील सीतामऊ येथे होते. त्यांनी येथील विविध विकास कामांचे लोकापर्ण केले. सुवासरा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी मोदी सरकारने देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांसाठी दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme)  माध्यमातून हे शक्य झाले आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती. आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. 

आणखी बातम्या...

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

-   मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

-  जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन    

- "येत्या पाच वर्षांत ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार"    

- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन    

- गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास    

- आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस    

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान