शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

'गलवान'मध्ये ४२ चिनी सैनिक ठार; भारतीय जवानांसोबतचे भांडण पडले महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 1:08 PM

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राचा दावा

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जून २०२०मध्ये भारत आणि चीनचे सैनिक भिडले. या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. मात्र, चीनने मृत सैनिकांची संख्या कायम लपवली.  केवळ ४ सैनिक मरण पावल्याचे चीनने म्हटले हाेते. आता या प्रकरणात हिंसक झटापट सुरू असताना चीनचे ३८ सैनिक वाहून गेल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'ने दिले आहे. त्यामुळे गलवान संघर्षात चीनचे ४२ सैनिक मरण पावल्याचे स्पष्ट झाले आहे.  

'गलवान डिकोडेड' नावाचे हे वृत्त 'द क्लॅक्सन'च्या स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांच्या टीमने प्रसिद्ध केले आहे.  भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अनेक जवान गलवान नदीत वाहून गेले होते, अशी माहिती 'द क्लॅक्सन'ने प्रसिद्ध केली आहे.गलवानमध्ये रात्रीच्या सुमारास झटापट झाली. त्यावेळी चीनचे कमीत कमी ३८ सैनिक नदीत बुडाले, असा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेईबोच्या हवाल्याने करण्यात आला हाेता. 

गलवानमधील संघर्षात केवळ ४ सैनिक मारले गेल्याचा दावा चीन सरकारने केला होता. 'त्या रात्री नेमके काय घडले, कोणत्या कारणामुळे झटापट झाली, संघर्ष पेटला, याबद्दलची सगळीच माहिती चीनकडून लपवण्यात आली. चीनने जगाला धादांत खोटी माहिती दिली. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग्स आणि पेजेस डिलीट केले. मात्र, चीनमधून मिळालेल्या डिजिटल अर्काईव्हमधून वेगळाच तपशील पुढे आला आहे', असे 'द क्लॅक्सन'ने वृत्तात म्हटले आहे.

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन साेहळ्यावर भारताचा बहिष्कार-

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक २०२२ ला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या सैनिकाला टॉर्च बेअरर बनविताच भारताने कडाडून विरोध केला. ‘आमच्या देशाचे राजदूत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत,’ असे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘चीन ऑलिम्पिकआडून राजकारण खेळत आहे, ही दुर्दैवी बाब म्हणाली लागेल. बीजिंगमधील भारताचे कार्यवाहक राजदूत हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनात किंवा समारोप सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.’

टॅग्स :Indiaभारतchinaचीन