शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

अडत्यांशिवाय झाले ४३ लिलाव शेतकर्‍यांना बाजार समितीचे सहकार्य : अडत असोसिएशन बेमुदत संपावर ठाम

By admin | Published: July 12, 2016 12:07 AM

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदारांचा बंद असूनही फळ व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ४३ लिलाव झाले.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदारांचा बंद असूनही फळ व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ४३ लिलाव झाले.
हे लिलाव शेतकर्‍यांकडून कुठलेही शुल्क, कर न आकारता झाले. अडतदारांनी आणखी बंद सुरूच ठेवला तरी बाजार समितीमध्ये अडतदारांशिवाय लिलाव करण्यास बाजार समिती सहकार्य करणार असून, जागाही नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाईल. फळ व भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी व ग्राहकांनी भाजीपाला, फळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी यावे, असे सभापती प्रकाश नारखेडे यांनी म्हटले आहे.

बंद सुरू ठेवू
खुला बाजार व्यवस्थेला विरोध करण्यासाठी बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट अडत असोसिएशनने हा बंद किंवा संप पुढेही सुरू ठेवला जाईल, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे हा बंद किती दिवस सुरू राहील हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

अडतदारांशिवाय लिलाव करण्यास मुभा
फळ व भीजापाला मार्केटमध्ये अडतदारांनी बंद पुकारला असला तरी जे शेतकरी या मार्केटमध्ये आपला भाजीपाला विक्रीसाठी आणतील त्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ग्राहकांना थेट शेतकर्‍यांकडून भाजीपाला खरेदी करता येईल. अडतदारांशिवाय लिलाव करता येतील. फक्त खरेदीदारांना ठरलेले शुल्क भरावे लागेल, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.

शेतकरी हित जोपासू
अडतदारांनी बंद पुकारलेला असला तरी शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. फळ व भाजीपाला मार्केट, धान्य मार्केटमध्ये शेतमालाचे लिलाव नियमीत होतील. गरज पडली तर पोलीस कुमक मागवून कार्यवाही करू. शेतकरी हित जोपासण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे सभापती प्रकाश नारखेडे यांनी सांगितले.

संपात हमाल सहभागी नाहीत
बाजार समितीमधील संप किंवा बंदमध्ये हमाल, माथाडी, मापाडी कामगारांचा सहभाग नाही. धान्य मार्केट नियमीतपणे सुरू असल्याचे कामगार संघटनेेने म्हटले आहे.

थेट विक्रीसाठी यंत्रणा उभारा
शासनाने शेतमाल थेट ग्राहकाला विक्री करण्यासाठी कायदा केला, निर्णय घेतले, परंतु अडतदार हे असहकार्य करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. अडतमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून द्या. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी जागा द्या. त्याचा प्रचार करावा, असे भाजीपाला उत्पादक दिनकर भंगाळे म्हणाले.