शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 5:13 PM

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रसने एकहाती सत्ता मिळवत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुरू असलेली स्पर्धा अखेर दिल्लीतून आदेश आल्यानंतर संपली. त्यामुळे, सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आणि डीके शिवकुमार वेटींगवर राहिले. आता, काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचा दावा भाजपा आमदाराने केला आहे. देशातील काही राज्यात सत्ताधारी पक्षाला सुरुंग लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे, कर्नाटकमध्येही भाजपाचाच तोच प्रयत्न आहे का, असा प्रश्न आमदाराच्या या दाव्यानंतर उपस्थित होत आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. भाजपा नेता बसनगौडा आर पाटील यांनी म्हटले की, काँग्रेसने वरिष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांना महत्त्व दिले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, हरिप्रसाद यांनी सिद्धरमैय्या यांच्याबाबतीत अनेक गोष्टी बोालून दाखवल्या आहेत. त्यामुळेच, जानेवारी महिन्यानंतर येथील सरकार कोसळणार, असा दावा बसनगौडा यांनी केलाय. 

काँग्रेसचे ४४ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही बसनगौडा आर. पाटील यांनी केला आहे. आता, आम्हीच सत्तेत येत आहोत, मग विरोधी पक्ष निवडीचा त्रास कशाला घ्यायचा, असेही पाटील यांनी म्हटले. 

दरम्यान, हैदराबाद येथे आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बीके हरिप्रसाद, मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे तिन्ही नेते होते. मात्र, येथे हरिप्रसाद यांना बोलण्याची संधी दिली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही येथे व्यासपीठावर भाषण केले. तर, हरिप्रसाद यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, ते नाराज असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा