शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आयआयटी, एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थ्यांची गळती

By admin | Published: August 06, 2015 2:09 AM

गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी माहिती मंगळवारी अधिकृतपणे समोर आली आहे. ही माहिती देतानाच सरकारने योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.२०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांत विविध आयआयटींमधून २,०६०, तर तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधून (एनआयटी) २,३५२ विद्यार्थी बाहेर पडले. विविध संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश, वैयक्तिक आणि वैद्यकीय गरज, पदव्युत्तर शिक्षण घेताना नोकरी लागणे तसेच शैक्षणिक ताण न झेपणे यासारखी विविध कारणे त्यामागे आहेत, असे त्या लेखी उत्तरात म्हणाल्या. आयआयटी रुरकीमधून सर्वाधिक २२८, त्यापाठोपाठ आयआयटी खरगपूर (२०९) आणि आयआयटी दिल्ली (१६९) विद्यार्थी बाहेर पडले. आयआयटी रुरकीमधील ७३ विद्यार्थ्यांना गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, की या निर्णयाला आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने सदर संस्थेचा निर्णय योग्य ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची शैक्षणिक कामगिरी नव्हती. या विद्यार्थ्यांनी पुन्हा योग्य दर्जा मिळविला तरच त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाईल.दोन अपहृत प्रोफेसर्सना परत आणण्याची मागणी१लिबियात अपहरण झालेल्या दोन भारतीय प्रोफेसर्सना मायदेशी परत आणण्याची मागणी तेलगू देसमचे के. राममोहन नायडू यांनी शून्य तासाला लोकसभेत मुद्दा उपस्थित करताना केली. आंध्र प्रदेशमधील प्रो. गोपाल आणि त्यांचे तेलंगणामधील सहकारी अद्यापही अपहृतांच्या तावडीत आहेत. अन्य दोन प्राध्यापकांची मात्र सुटका करण्यात आली आहे.२ इराकमध्ये ३९ भारतीयांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. त्याच धर्तीवर प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय महिला साक्षरता दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली. ३खासदार आणि माजी खासदारांच्या वाहनांसाठी देशभरात टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी अण्णा द्रमुकचे सी. गोपालकृष्णन यांनी केली. राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्याला मुभा दिली जावी, असे याच पक्षाचे खा. पी. आर. सेंथीलनाथन यांनी म्हटले.