शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:28 IST

Gujarat Flood: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले.

अहमदाबाद - ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले. दरम्यान, देशातील १९ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील जवळपास १०६ गावांना पुराचा इशारा दिला आहे.

देशात कुठे काय घडले?- गुजरातसोबत बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानच्या जोधपूर, उदयपूर, भीलवाडा, माडमेर या शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे._आंध्र प्रदेश, तेलंगणा व त्रिपुरात पावसाशी निगडित घटनांमुळे गत ७ दिवसांमध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला. नागलँडमध्येही पूरस्थिती आहे.कलाकारांचे योगदानतेलगू चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते पूरग्रस्तांच्या  मदतीला धावून आले आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन व महेश बाबू या तिघांनी दोन्ही राज्यांना पूर मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली. या तिघांनी दोन्ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली आहे.पूर का आला?अहमदाबाद : मोठ्या प्रमाणावर होत असलेला  शहरी विकास हा गुजरातमधील पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरच्या (आयआयटी - जीएन) संशोधकांनी केला आहे. शहरीकरणासोबत सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे हे संकट उद्भवल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.

 

टॅग्स :Gujaratगुजरातfloodपूर