शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 1:27 PM

Gujarat Flood: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले.

अहमदाबाद - ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले. दरम्यान, देशातील १९ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील जवळपास १०६ गावांना पुराचा इशारा दिला आहे.

देशात कुठे काय घडले?- गुजरातसोबत बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानच्या जोधपूर, उदयपूर, भीलवाडा, माडमेर या शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे._आंध्र प्रदेश, तेलंगणा व त्रिपुरात पावसाशी निगडित घटनांमुळे गत ७ दिवसांमध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला. नागलँडमध्येही पूरस्थिती आहे.कलाकारांचे योगदानतेलगू चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते पूरग्रस्तांच्या  मदतीला धावून आले आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन व महेश बाबू या तिघांनी दोन्ही राज्यांना पूर मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली. या तिघांनी दोन्ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली आहे.पूर का आला?अहमदाबाद : मोठ्या प्रमाणावर होत असलेला  शहरी विकास हा गुजरातमधील पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरच्या (आयआयटी - जीएन) संशोधकांनी केला आहे. शहरीकरणासोबत सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे हे संकट उद्भवल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.

 

टॅग्स :Gujaratगुजरातfloodपूर