शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

१२ राज्यांतून प्रवास करणाऱ्या ५ भारतीय रेल्वे; दिब्रूगढ़ - कन्याकुमारी अंतर ४२४७ किलोमीटर, लागतात ८२.५० तास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 7:21 AM

Indian Railways : लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश आहे. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा वेग कमी होताच इंडियन रेल्वेनेरेल्वेंचा वेग आणि संख्या वाढवली आहे. लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेशआहे. यात अशा काही रेल्वे आहेत की, ज्या १२-१२ राज्यांत प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. यात त्यांना अनेक दिवस लागतात. भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या या आहेत पाच रेल्वे.

१ दिब्रूगढ कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस : भारतात सर्वात लांबच्या अंतराचा प्रवास करणाऱ्या रेल्वेंत ही क्रमांक एक आहे. ही रेल्वे दिब्रूगढ़ ते कन्याकुमारी हे ४२४७ किलोमीटरचे अंतर ८२.५० तासांत पूर्ण करते. या प्रवासात ही रेल्वे ५७ स्थानकांवर थांबते.

२ कटरा-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस : ही देशातील लांबचा प्रवास करणारी दुसरी रेल्वे आहे. हिचा प्रवास ३७८२ किलोमीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी ७१ तास ४० मिनिटे लागतात. ही गाडी माता वैष्णो देवी कटरा हून कन्याकुमारीला पोहोचते. १२ राज्यांतून जाणारी ही रेल्वे ७५ स्थानकांवर थांबते. याशिवाय भारतात कोणत्याही रेल्वेला इतक्या ठिकाणी थांबावे लागत नाही.

३ कटरा-मंगळुरू नवयुग एक्स्प्रेस : ही रेल्वे देशात तिसरी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. ती जम्मू-कश्मीरमधील कटराहून मंगळुरूला पोहोचते. हा प्रवास ७२.५० तासांचा असून ३६७४ किलोमीटरचे अंतर कापते. ही रेल्वे १२ राज्यांत ६७ स्थानकांवर थांबते.

४ न्यू तिनसुकिया-बंगळुरू सिटी एक्स्प्रेस : ही रेल्वे आसाममधील न्यू तिनसुकियाहून निघून ६५ तास ५५ मिनिटांत ३६१५ कि.मी.चा प्रवास करून बंगळुरूला थांबते.

५ गुवाहाटी-तिरुअनंतपूरम एक्स्प्रेस : आसाममधील गुवाहाटीहून निघून केरळमधील त्रिवेंद्रमपर्यंत जाते. या प्रवासासाठी ६४.१५ तास लागतात व ३५५२ किलोमीटरचा प्रवास घडतो. ५० स्थानकांवर ती थांबते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे