शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 8:27 AM

मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील मेरठ गावात वीजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते. डीजेच्या मोठ्या आवाजासह कावड यात्रा गावात दाखल होताच रस्त्याच्याकडेला टांगलेल्या हाय टेंशन लाइन डीजेला धडकली आणि डीजे आणि विद्युत प्रवाह वाहू लागला. कोणाला काही समजण्याआधीच यात्रामधील लोक एकामागून एक वेदनेने जमीनीवर कोसळू लागले. सगळीकडे आरडाओरडा झाला. कोणीतरी पॉवर हाऊसला फोन करून बंद करण्याची विनंती केली पण कोणी ऐकली नाही. मग स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन यात्रेतील अनेक लाोकांना वीज प्रवाहातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक कावड यात्री जखमी असल्याची माहिती समोर आली.

गंगानगर येथील आयआयएमटी रुग्णालयात पोहोचलेल्या मनीषचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान चार कवाड यात्रींचा मृत्यू झाला, त्यापैकी दोन सख्खे भाऊ होते. एडीजी राजीव सभरवाल, डीएम दीपक मीना आणि एसएसपी रोहित सिंह सजवान हेही जखमींना पाहण्यासाठी पोहोचले. दुसरीकडे वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावाबाहेरचा रस्ता रोको करून मेरठ-फोर्ट रस्ता रोखून धरला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू