शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

हृदयद्रावक! वधू-वरांच्या स्वागताची जय्यत तयारी अन् मृतदेहांची लागली रांग; जोडप्यासह 11 जण चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 4:21 PM

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका छोट्याश्या चुकीमुळे मृतदेहांची राग लागली. हा अपघात एतका मोठा होता की,  काही वेळातच पाच जणांचे मृतदेह रस्त्यावर पसरले. मृतदेहांचे तुकडे कारमध्ये अडकले, जे कसेतरी कारमधून बाहेर काढण्यात आले. अपघाताची ही भयावह दृश्ये पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. हा अपघात उत्तर प्रदेशात झाला मात्र अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होते.

लग्न झाल्यानंतर वधू-वरांसह नातेवाईक आपल्या घरी परतत होते. मात्र, तितक्यात संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील सुजानगढ पोलीस स्टेशन हद्दीतील तांडा गावात राहणाऱ्या राकेशचे लग्न झाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील रहिवासी नेहासोबत 27 वर्षीय राकेश विवाहबंधनात अडकला. या लग्नासाठी चुरूपासून गोरखपूरपर्यंत अनेक वाहनांतून वऱ्हाडी मंडळी निघाली होती. लग्न लागल्यानंतर सर्व मंडळी राजस्थानला परतत असताना अपघात झाला आणि तो दिवस अखेरचा ठरला. राकेश आणि नेहा एका कारमध्ये बसले होते, ज्यामध्ये कुटुंबातील इतर नऊ सदस्य देखील होते. तर काही जण इतर वाहनांतून नवऱ्याच्या घराकडे निघाले होते. दुसरीकडे, तांडा गावात कुटुंबातील इतर सदस्य नववधूच्या स्वागताची तयारी करत होते.  

5 जणांचा जागीच मृत्यू दरम्यान, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. उत्तर प्रदेशातून राजस्थानला परतत असताना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. काही लोक शौचालय वापरण्यासाठी खाली उतरले आणि परत बसणार होते. गाडीचा चालकही बाहेर आला होता आणि तोही गाडीच्या दिशेने जाणार होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. 

याशिवाय कारमधील एका महिलेचाही मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, बाबुलाल, नेमीचंद, कैलास, राकेश, तांडा गावात राहणाऱ्या नवरदेवाचे नातेवाईक मरण पावले. कारमध्ये बसलेल्या मिथलेश या महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. वधू-वरांसह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यूmarriageलग्न