शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:10 IST

एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना

ठळक मुद्देगहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाएकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना

राजस्थानमध्ये सध्या मद्यविक्रीच्या दुकांनांचा लिलाव सुरू आहे. यामध्ये अमुमानगढ जिल्ह्यातील कुईंयां गावातील एका मद्यविक्रीच्या दुकानासाठी बोली प्रक्रिया सुरू होती. या मद्य विक्रीच्या दुकानाची बोली ही ७२ लाखांपासून सुरू झाली पण ती थांबण्याचं नावच घेत नव्हती. या मद्यविक्रीच्या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये सुरू झालेल्या चढाओढीमुळे सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही लिलावाची प्रक्रिया रात्री २ वाजता संपली. कुटुंबातील एका महिलेनं ७२ लाखांचं दुकान चक्क ५१० कोटी रूपयांना विकत घेतलं. गेल्या वर्षी कुईंयां गावातील मद्यविक्रीच्या दुकानाची ६५ लाख रूपयांना विक्री करण्यात आली होती. यावर्षी या दुकानासाठी बोली प्रक्रिया ७२ लाखांपासून सुरू करण्यात आले. परंतु या दुकानाच्या खरेदीवरुन एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये तू तू मी मी करत सामना रंगला. यानंतर सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा सामना रात्री २ वाजता ५१० कोटी रूपयांवर संपला. इतकी मोठी बोली लागल्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ५१० कोटींची बोलीउत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजता ही बोली प्रक्रिया संपल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरूवात केली आहे. ५१० कोटी रूपयांची बोली लावणाऱ्या या महिलेचं नाव किरण कंवर असं असून त्यांना आता दोन दिवसांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यावर अद्यापही विश्वास होत नाहीये. परंतु या लिलावाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना त्यांना अलॉटमेंट लेटर जारी केलं आहे. तसंच जर विजेत्यानं आता दुकान विकत घेतलं नाही तर पुढील वेळेपासून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचंही विभागानं स्पष्ट केलं आहे. गहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाराजस्थानमध्ये अशाप्रकारे या प्रक्रियेद्वारे विक्री करण्यात येत असल्याचा लोकांकडूनही विरोध करण्यात आला आहे. ज्या दुकानांची पाच ते दहा लाखांत विक्री होत होती त्यांची यावेळी पाच ते दहा कोटी रूपयांत विक्री झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बेरोजगारांना संधी देण्यासाठी आणि मद्याची अवैधरित्या विक्री थांबवणअयासाठी बोली प्रक्रिया बंद केली होती. तसंच या ठिकाणी लॉटरी सिस्टम सुरू करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १५ वर्ष जुनी व्यवस्था संपवून पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली. यातून सरकारला हजारो कोटी रूपयांचा महसूलही मिळाला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतChief Ministerमुख्यमंत्री