शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 05:44 IST

तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.

चंद्रकांत कित्तुरेहैदराबाद : उत्तरेतील तीन राज्यांत भाजप विजयाची पताका फडकावत असतानाच तेलंगणात काँग्रेसने मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) तीनतेरा वाजविले. विधानसभेच्या ११९ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकत तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सत्ता संपादन केली. याचबरोबर सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचे केसीआर यांचे स्वप्नही धुळीस मिळविले. यामुळे भारत राष्ट्र समितीला देशपातळीवरील पक्ष बनविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही ब्रेक लागणार आहे.

कर्नाटकपाठोपाठ तेलंगणांमधील या यशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत मोठे बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या या विजयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि  तेलंगणाचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे. तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. त्यांनी दहा वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र  कालेश्वर धरण प्रकल्पावरून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि  प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष त्यांना भोवला.  भाजपने तेलंगणात आपल्या तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तरीही थोडेफार संख्याबळ वाढविण्या-इतपतच या पक्षाला यश मिळाले.

आश्वासनपूर्तीचे काँग्रेसपुढे आव्हानकर्नाटकप्रमाणेच काँग्रेसने तेलंगणातही निवडणूक जाहीरनाम्यात सहा हमी दिल्या होत्या. घरातील कर्त्या महिलेच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास ही महालक्ष्मी योजना, रयतू भरोसा योजनेअंर्तगत फाळ्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी १५ हजार, शेतमजुराला १२ हजार रुपये आणि भातपिकाला ५०० रुपये बोनस, गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक घरात २०० युनिट-पर्यंत मोफत वीज, इंदिराअम्मा योजनेअंतर्गत तेलंगणा चळवळीतील सैनिकांना २५० चौरस यार्डचा भूखंड, बेघरांना जागा व प्रत्येकी ५ लाख रुपये, युवा विकासम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५ लाखांचे विद्याभरोसा कार्ड, प्रत्येक मंडलामध्ये तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल, ज्येष्ठांसाठी दरमहा ४ हजार रुपये पेन्शन व १० लाखांपर्यंतचा राजीव आरोग्यश्री विमा या हमींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल.

रेवंथ रेड्डी विजयाचे शिल्पकारकाँग्रेसला बहुमत मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हेच विजयाचे शिल्पकार ठरले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही तेच असतील. रेवंथ रेड्डी यांना तेलंगणा राष्ट्र समितीने २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट नाकारले होते. यामुळे त्यांनी केसीआर यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती