शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ

By admin | Published: March 24, 2016 2:10 AM

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात गेल्या एक जानेवारीपासून सहा टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता १२५ टक्के होणार आहे.दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्तावाढीमुळे सरकारवर वार्षिक १४,७२४.७४ कोटी रुपयांचा बोजा पडेल. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाटा ६७९५.५ कोटी तर पेन्शनधारकांचा ७९२९.२४ कोटी एवढा आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के करण्यात आला होता. ही वाढ १ जुलै २०१५ पासून लागू झाली होती. तत्पूर्वी एप्रिलमध्ये महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून तो ११३ टक्के करण्यात आला होता. १ जानेवारी २०१५ पासून ही वाढ लागू करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)....................................................राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच वाढ?केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढताच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्याच प्रमाणात वाढ देण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांनाही लवकरच याचा फायदा होण्याची शक्यता आहे.