शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

केंद्राकडून महाराष्ट्राला विशेष गिफ्ट, विशेष साह्य योजनेंतर्गत ५० वर्षांसाठी बिनव्याजी ६३१७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:39 AM

या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत राज्याला विक्रमी ६,३१७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्राने ही रक्कम ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात दिली आहे.

नवी दिल्ली : २०२३-२४ या वर्षाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष साहाय्य म्हणून केंद्र सरकारच्या योजनेचा महाराष्ट्र मोठा लाभार्थी ठरला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत राज्याला विक्रमी ६,३१७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्राने ही रक्कम ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात दिली आहे.

केंद्राने राज्यांना दिलेल्या निधीचा काही भाग इतर योजनांसाठी वापरण्याचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह इतर राज्यांना मंजूर पहिल्या टप्प्याच्या निधीतून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि रेल्वे प्रकल्पांना राज्याच्या वाट्याचे योगदान देण्यासाठी २० टक्क्यांपर्यंत निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील निधी अशा प्रकल्पांना वापरताना कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायचे याचे अधिकार भारत सरकारने राखून ठेवले आहेत. 

केंद्र प्रायोजित योजनांसाठीकेंद्र सरकार राज्य सरकारांना कर वितरण, वित्त आयोग अनुदान तसेच केंद्र प्रायोजित योजना आणि विविध क्षेत्रांमधील केंद्रीय क्षेत्र योजनांद्वारे आर्थिक साह्य प्रदान करीत असते. राज्यसभेत डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग यांनी सोमवारी ही माहिती दिली.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार