शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

६४ दिवस उपवासाने मुलीचा मृत्यू

By admin | Published: October 09, 2016 12:22 AM

वडिलांना व्यवसायात यश मिळावे म्हणून ६४ दिवस उपवास ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हैदराबादेत ही धक्कादायक घटना घडली. आराधना असे या मुलीचे नाव

हैदराबाद : वडिलांना व्यवसायात यश मिळावे म्हणून ६४ दिवस उपवास ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हैदराबादेत ही धक्कादायक घटना घडली. आराधना असे या मुलीचे नाव असून, ती जैन समाजातील आहे. आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये ८ व्या इयत्तेत शिकत होती. वडील लक्ष्मीचंद सनसाडिया यांचे सराफा व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून निघावे, त्यांच्या व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी आराधना उपवास करीत होती. चेन्नईतील पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आराधनाच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरायला लावले होते. आराधनाचे १० आठवड्यांचे चातुर्मास उपवास ३ आॅक्टोबर रोजी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाने त्याचे पारणे केले. या कार्यक्रमाला तेलंगणाचे एक मंत्री पद्म राव हे देखील उपस्थित होते. पारण्यानंतर लगेचच शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आराधनाला रुग्णालयात नेण्यात आले. उपासमारीमुळे ती कोमात गेली होती. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. उपवासामुळे तिची आतडी सुकून गेली होती, तसेच दोन्ही किडन्यांचीही मोठी हानी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. मुलाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी मुलीला चार महिने उपवास धरायला लावले, असे बाल हक्कुला संगम संस्थेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून जे कोणी या निर्दोष मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या संस्थेने केली आहे. (वृत्तसंस्था)पुजाऱ्याच्या सांगण्यावरून..!६४ दिवसांच्या उपवासानंतर १३ वर्षांच्या मुलीचा हैदराबादेत मृत्यूआराधनाने तिच्या कुटुंबाचा भाग्योदय व्हावा यासाठी चातुर्मासाचे उपवास धरले होते. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून तिच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरण्यास सांगितले होते.