शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चार टप्प्यांत ६७ टक्के मतदान, ४५ कोटी लोकांनी बजावला हक्क; निवडणूक आयोगाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 08:37 IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी झाली १ टक्का घट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांच्या एकत्रित मतदानाची आकडेवारी ६६.९५ टक्के होत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. सुमारे ९७ कोटी मतदारांपैकी ४५.१० कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

यासंदर्भात आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की २०१९मध्ये चार टप्प्यांत ६८.२४ टक्के मतदान झाले हाेते. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे. 

आयाेग प्रयत्नशील

जास्त मतदानासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध संस्था, इन्फ्लुएन्सर, नामवंत व्यक्तींनी सहकार्य देऊ केले आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये २३ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ३७९ जागांकरिता मतदान झाले आहे.

गेल्या निवडणुकीत काय झाले?

चाैथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांतील चौथ्या टप्प्याच्या तुलनेत हे मतदान ३.६५ टक्क्यांनी अधिक होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये ६५.६८ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी ६८.४ टक्के होती. दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाले होते. २०१९ साली ही आकडेवारी ६९.६४ टक्के होती. यावेळी पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के तर २०१९च्या निवडणुकांत ६९.४३ टक्के मतदान झाले होते.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग