शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST

CM Yogi Adityanath: गेल्या अवघ्या ३ दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

CM Yogi Adityanath: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. यानंतर आता प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. महाकुंभमेळ्यात सहभाग घेतल्यानंतर लाखो भाविक अयोध्येला जात आहेत. याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई पाहणी करून घेतला.

१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत जवळपास ३० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी हजेरी लावली. भारतासह अनेक परदेशी नागरिकही महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. यानंतर भाविक अयोध्येला राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. गेल्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि राम मंदिर परिसराची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. 

अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे

मुख्यमंत्री योगी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी आणि हनुमानगढीची हवाई पाहणी केली. मौनी अमावास्येनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आगामी वसंत पंचमी पर्वाच्या निमित्ताने सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. सलग आणि सातत्याने अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे एडीजी झोन, आयुक्त आणि पोलीस यांनी वसंत पंचमीच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि गर्दीच्या ठिकाणांची पायीच पाहणी केली.

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमी परिसराचे एसपी बलरामाचारी दुबे यांनी सांगितले की, मौनी अमावस्या उत्सवानिमित्त ३ लाख ८ हजार रामभक्तांनी दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजल्यापासून रामललाचे दर्शन सुरू होते आणि रात्री ११ वाजता राम मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते. वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश