शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

7th Pay Commission: DA वाढवण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा धक्का, बदलला हा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:14 IST

7th Pay Commission: केंद्र सरकारचे ६५ लाखांहून अधिक कर्मचारी हे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारचे ६५ लाखांहून अधिक कर्मचारी हे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टमधून २८ सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी महागाई भत्त्यामध्ये  ४ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करू शकते. मात्र यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसला आहे. सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार प्रमोशनसाठी किमान सेवा शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

२० सप्टेंबर रोजी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग  (DoPT) कडून समोर आलेल्या ऑफिस मेमोरेंडममध्ये सांगण्यात आले की, प्रमोशनसाठी किमान सेवा शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर करण्यात आला आहे.

डीओपीटीकडून प्रमोशनसाठी आवश्यक बदलांसाठी उपयुक्त संशोधन करून भरती नियम आणि सेवा नियमांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व मंत्रालये विभागांकडून योग्य प्रक्रियेचं पालन करताना भरती नियमांमध्ये आवश्यक बदलाची शिफारस करण्यात आली आहे. संशोधित नियमांतर्गत लेव्हल १ आणि लेव्हल २ साठी तीन वर्षे सेवा करणे आवश्यक आहे. मात्र लेव्हल ७ आणि लेव्हल ८ साठी केवळ दोन वर्षांची सेवा देणे आवश्यक आहे.

सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए मार्च २०२२ मध्ये वाढवण्यात आला होता. त्यावेळी सरकारने यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती. तो तेव्हा तो ३१ टक्क्यांनी वाढून ३४ टक्के वाढली होती. त्यावेळी सरकारकडून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा एरियर देण्यात आला होता. आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील जुलै महिन्यापासूनची वाढ ड्यू आहे. त्यामध्ये २८ सप्टेंबर रोजी ४ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.  

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी