शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

७० वर्षांनी देशात चित्ते गुरगुरणार; शनिवारी राष्ट्रीय उद्यानात होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 05:54 IST

१९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते.

भोपाळ : देशातून लुप्त झालेल्या चित्त्याची ७० वर्षांनी वापसी होणार आहे. मध्य प्रदेशच्या कुनो-पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात १७ सप्टेंबर रोजी चित्ते दाखल होतील. मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वन संरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले की, चित्त्यांना आफ्रिकी देश नामिबियातून राजस्थानच्या जयपूरमध्ये आणले जाईल. त्यानंतर एका हेलिकॉप्टरद्वारे १७ सप्टेंबरच्या सकाळी कुनो-पालपूरमध्ये आणले जाईल. छोटे हेलिकॉप्टर असल्यास चित्त्यांना जयपूरहून कुनो-पालपूरमध्ये स्थानांतरित करण्यासाठी दोन विमानांची गरज भासेल.

पंतप्रधान सोडणार जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी चित्त्यांना जंगलात सोडणार आहेत. यासाठी विशेष अधिवास तयार करण्यात आला आहे. एक महिनाभर चित्त्यांना येथे ठेवले जाईल. 

महाराजा रामानुज यांनी मारला होता अखेरचा चित्ता

१९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते. १६ व्या शतकात देशात हजारो चित्ते होते; परंतु राजा-महाराजांनी केलेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या कमी होत गेली. १९५२ मध्ये भारत सरकारने चित्त्याला विलुप्त प्रजाती घोषित केले. संपूर्ण जगात सध्या केवळ ७,००० चित्ते अस्तित्वात आहेत व यातील बहुतांश चित्ते आफ्रिकेच्या जंगलात आहेत.

घटनाक्रम१९५५ मध्ये आंध्र सरकारच्या वन्य प्राणी बोर्डाने राज्याच्या दोन जिल्ह्यांत इराणहून दोन चिते भारतात आणण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. साठच्या दशकात केनिया सरकारने भारताला चित्ते देण्याची तयारी दर्शवली होती. १९७० मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने इराण सरकारकडून चित्ते मिळविण्यासाठी चर्चा सुरू केली होती; परंतु इराणमध्ये सत्ताबदल झाल्याने चर्चा ठप्प झाली.

ऑगस्ट २००९ मध्ये इराणने चित्ते पाठविण्याची तयारी दर्शवली होती. त्या बदल्यात त्या देशाला भारतातून एशियाटिक लॉयन पाहिजे होते. भारताने ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने चर्चा पुन्हा ठप्प झाली. चित्त्यांच्या पुनर्प्रवेशासाठी मागील दशकात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसह १२ राज्यांत अध्ययन करण्यात आले होते. २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आफ्रिकी चित्ते आणण्यावर रोख लावली होती. २०२० मध्ये ती रोख हटविण्यात आली. त्यानंतर लगेच या योजनेवर काम सुरू झाले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNarendra Modiनरेंद्र मोदी