शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बांगलादेशला जाणारे कांद्याचे राेजचे ८० ट्रक जागेवर थांबले, विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 11:37 AM

बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार

अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या असून, बांगलादेशमध्ये भारताकडून हाेत असलेली शेतमालाची आयातही थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. 

नाशिकमधून दररोज ६० ते ७० ट्रक कांदा दरराेज बांगलादेशला ट्रकद्वारे रवाना हाेतो. एका ट्रकमध्ये तीस टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत ओढवू शकते.  नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष अन् कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते.

बिहारमध्ये अलर्ट जारीबिहारच्या अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलांसह पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची सीमा नेपाळशी आहे, ज्याचा वापर इतर देशांतील घुसखोर भारतात प्रवेश करण्यासाठी करतात, असे पोलिसांनी सांगितले.

सीमेजवळ जाणे टाळा...सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगला देशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना सीमावर्ती भागात, विशेषत: रात्रीच्या वेळी अनावश्यक जाऊ नका, असे आवाहन केले आहे.

विमाने रद्दएअर इंडिया, इंडिगोसह भारतातील काही प्रमुख कंपन्यांनी बांगलादेशासाठीची विमानसेवा तातडीने स्थगित केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असून, विमानसेवा स्थगित केल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

भारताच्या वस्त्रोद्योगावर परिणामबांगलादेशातील राजकीय संकट भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी चिंतेचा विषय झाला आहे. येथील कोणत्याही पुरवठ्यात व्यत्यय आल्यास त्याचा पुरवठा साखळीवर तत्काळ परिणाम होईल, त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल, असे भारतीय कापड उद्योग परिसंघाने (सिटी) म्हटले आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशagitationआंदोलनonionकांदा