शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

८.६ टक्केच महिला उमेदवार

By admin | Published: April 10, 2016 2:16 AM

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय

गुवाहाटी : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांनी इ.स. २०११ च्या तुलनेत यंदा कमी महिलांना तिकीट दिले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी फक्त सहा महिला जास्त आहेत. गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ (सर्व काँग्रेस) विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष आसाम गण परिषद (अगप), बीपीएफ तसेच एआययूडीएफसारख्या सर्व महत्त्वाच्या पक्षांनी महिलांवर विश्वास दाखवलेला नाही. आगपमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. या पक्षाने केवळ दोन महिलांना तिकीट दिले आहे. गेल्यावेळी पक्षाच्या आठ महिला रिंगणात होत्या. भाजपाचा अन्य मित्र पक्ष बीपीएफने २०११ साली तीन महिलांच्या तुलनेत यावेळी फक्त दोघींनाच तिकीट दिले आहे. ७४ जागांवर निवडणूक लढवित असलेला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष एआययूडीएफने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. माकपा,भाकपा (माले), समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि युनायटेड पीपल्स पार्टीने प्रत्येकी एका महिलेला संधी दिली आहे. तर एसयूसीआयने तीन महिलांना रिंगणात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)सत्ताधारी काँग्रेसने आपल्या १२ विद्यमान आमदारांसह १६ महिलांना उमेदवारी दिली आहे. २०११ ला ही संख्या १९ होती. पक्षाच्या दोन आमदारद्वय मंदिरा राय (अलगपूर) आणि अमिया गोगोई (दुलिआजान) यांना वगळण्यात आले असून यावेळी चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात बबिता शर्मा (गुवाहाटी पूर्व), डॉ.जुरी शर्मा बारदोलई (गुवाहाटी पश्चिम), अंगकिता दत्ता (अमगुरी) आणि पल्लवी सैकिया गोगाई (टेओक)यांचा त्यात समावेश आहे. भाजपा ८९ जागांवर निवडणूक लढवित आहे. या पक्षाने यंदा केवळ सहा महिलांना रिंगणात उतरविले आहे. २०११ मध्ये पक्षाने नऊ महिलांना उमेदवारी दिली होती.