शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 11:46 AM

दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात

इम्फाळ : मणिपूरमधील खामेनलोक भागातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार व दहा लोक जखमी झाले आहेत. मैतेई जमातीची बहुसंख्या असलेला इम्फाळ पूर्व जिल्हा व कांगपोकी या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कुकी जमातीच्या गावाला मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी वेढा दिला. त्यावेळी दहशतवादी व गावकऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. मात्र, या घटनेनंतर इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी शिथिल करण्याचा कालावधी कमी केला आहे. मणिपूरमधील १६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये मैतेई व कुकी जमातींमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू व ३१०पेक्षा अधिक जण जखमी झाले. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मैतेई जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी ३ मे रोजी मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला.

या राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ मणिपूरमध्ये शांतता होती; पण आता पुन्हा हिंसक घटना घडल्या. (वृत्तसंस्था)

‘डबल इंजिन’चे सरकार अपयशी का ठरले?

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी का ठरत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्या राज्यातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एक बैठकही घेतली नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारterroristदहशतवादी