शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 05:36 IST

हिज्बुल मुजाहिद्दिनच्या चौघांना टिपले : २४ तासांतील दुसरी धाडसी कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचे चार अतिरेकी ठार झाले. रविवारी रेबन गावातील चकमकीत ठार झालेले पाच जमेस धरले, तर जिल्ह्यात दोन दिवसांत एकूण नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्कर, सीआरपीएफ व राज्य पोलिसांनी पिंजोरा गावात रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू केलेली कारवाई सोमवारी दुपारपर्यंत सुरू होती. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले असून, त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. जुलै २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहाण वणी मारला गेल्यापासून शोपियान जिल्हा हे दशतवाद्यांचे मुख्य केंद्र बनल्याचे दिसत आहे. रविवारच्या रेबन येथील चकमकीत ठार झालेल्यांमध्ये हिज्बुलचा कमांडर फारुख असद नल्ली याचाही समावेश होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.गेल्या २४ मार्चला ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींत काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)अतिरेक्यांनी केली सरपंचाची हत्याश्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोराचे सरपंच अजय पंडित यांची अतिरेक्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच गावात गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडित हे काँग्रेस पक्षाचे सदस्यही होते.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या हत्येचा निषेध केला व पंडित हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हटले. या हत्येची अजून कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.जम्मू : यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये ८८ अतिरेक्यांना (त्यात काही टॉप कमांडर्सही होते) ठार मारण्यात आले असून इतर २८० जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सोमवारी येथे दिली.सीमेपलीकडून काश्मीर खोºयात अनेक अतिरेकी घुसवून हिंसाचार वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे सिंग म्हणाले.नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही दोन प्रकारचे धोरण राबवत आहोत. याशिवाय अतिरेक्यांच्या संघटनांत स्थानिक युवकांनी जाऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहोत. यात आम्हाला बरेच यश आले आहे, असे सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले.24 तासांत हिज्बुल मुजाहिदीनच्या ९ अतिरेक्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ठार मारण्यात आल्याचा संदर्भ देऊन सिंग म्हणाले की, सुरक्षादलांचा प्रयत्न हा खोºयातून दहशतवाद नियंत्रणात आणून पुसून टाकण्याचा आहे.02 आठवड्यांत नऊ मुख्य मोहिमांमध्ये सहा टॉप कमांडर्ससह मारल्या गेलेल्या २२ अतिरेक्यांंनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीर