शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 08:14 IST

करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो.

नवी दिल्ली : देशभरात सध्या आठवड्यात कामाचे तास किती असावे, यावरून वाद सुरु आहे. काही आघाडीच्या उद्योगपतींनी आठवड्यातील तासांची कमाल मर्यादा वाढवून ७० ते ९० तास करावी, असे सुचविले होते. यावर विविध स्तरांमधून टीकाही झाली होती. परंतु केंद्र सरकारने अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे हे स्पष्टीकरण दिले आहे.

करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. कामगार कायद्यांची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारे त्यांच्या अधिकारक्षेत्रात करीत असतात. बहुतांश उद्योग आणि कॉर्पोरेट कंपन्या या कायद्यांनुसार चालतात.

कुणामुळे सुरू झाला वाद?

हा वाद लार्सन अँड ट्युब्रो लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी एस. एन. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यानंतर सुरु झाला. त्यात त्यांनी आठवड्याला २० तास काम करावे असे म्हटले होते. याला इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे असे सांगत एकप्रकारे समर्थनच दिले होते.

मात्र, आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका 3 यांनी याला आक्षेप घेत अधिक तास काम केल्याने थकवा आणि निराशा वाढते असे म्हटले होते. तर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेला महत्त्व द्यायला हवे, असे म्हटले होते.

आरोग्य संघटनेचे म्हणणे काय?

जागतिक आरोग्य संघटना व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या संयुक्त अभ्यासानुसार, कामाच्या वाढीव तासांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच मानसिक आजारांचा धोका वाढतो. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे १२ अब्ज कामाचे दिवस केवळ नैराश्य आणि चिंतेमुळे वाया जातात. यातून दिवसाला एक ट्रिलियन डॉलरचा अर्थात ७ हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते.

आर्थिक पाहणी अहवालातही विरोध

नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणातही असे नमूद केले आहे की आठवड्याला ६० तासांपेक्षा अधिक काम केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

जे लोक रोज १२ तास किंवा अधिक वेळ कार्यालयात घालवतात त्यांना मानसिक तणावाचा जास्त धोका असतो, असेही यात म्हटले होते.

कामाच्या तासांची संख्या हे उत्पादकतेचे मोजमाप करण्याचा निकष असला तरी ५५-६० तासांपेक्षा अधिक वेळ काम केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

सध्या कामाच्या अटी, कामाचे तास आणि ओव्हरटाइम आदींबाबत नियम फॅक्टरीज अॅक्ट १९४८ तसेच विविध राज्यांच्या शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट अॅक्टमधील तरतुदींनुसार केलेले आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarayana Murthyनारायण मूर्तीLabourकामगारministerमंत्री